नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान किसान योजना सुरू केली आहे. देशातील लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. नुकताच शासनाने या योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे, मात्र काही शेतकरी असे आहेत की ज्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत.
पंतप्रधान किसान योजना खात्यात न येण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये ई-केवायसी, तुमचे बँक खाते आधारशी लिंक न करणे आणि नाव किंवा दस्तऐवजातील तफावत यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जे शेतकरी ई-केवायसी करणार नाहीत त्यांना याचा 17वा हप्ता मिळणार नाही. त्यांचे पैसे अडकू शकतो. त्यासाठी लवकरात लवकर करून घ्यावे
लाभार्थी शेतकऱ्यांनी जमीन पडताळणी सुद्धा करून घेणे आवश्यक आहे, जे लाभार्थी हे काम करणार नाहीत त्यांना हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते