नमस्कार मित्रांनो,राज्यातील सुशिक्षित बेरोजगार आणि कर्मचारी वर्ग यांच्यासाठी दिलासादायक असा एक शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. काय आहे हा शासन निर्णय? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
मित्रांनो, शासनाच्या कामगार विभागाने, कामगार आयुक्तालय व कामगार विभागाच्या अधिनस्त असलेल्या इतर कार्यालयांसाठी बाह्य स्त्रोताद्वारे मनुष्यबळ घेण्यासाठी मागील ९ वर्षापूर्वीच्या शासन निर्णयानुसार २ कंपन्यांच्या पॅनलला ३ वर्षाच्या कालावधीसाठी मंजुरी देण्यात आली होती. त्या पॅनेल वरील पुरवठा दाराच्या सेवा घेण्यासाठी इतर विभागांना मुभा देण्यात आली होती.
सदर कालावधी संपुष्टात आल्यानंतर सदर पॅनलला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु सदर पॅनल कडून कोणताही पाठपुरावा न केल्यामुळे सदर मुदतवाढ दिनांक १८.०१.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये संपुष्टात आणण्यात आली आहे