राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिला मोठा दिलासा.! राज्यातील या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आता मोफत वेज

नमस्कार मित्रांनो अर्थसंकल्पात अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये महत्त्वाची घोषणा म्हणजे आता शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी सौर ऊर्जा पंप मागितल्यास सरकार त्यांना सौर ऊर्जा पंप देईल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी येथे अर्ज करा व गिरणी मिळवा

 

शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्या वेगळ्या करण्यासाठी आणि सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी 15,000 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी मागेलला सौरऊर्जा पंप दिले जाणार आहेत. या योजनेसाठी 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. मोफत विजेची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप देण्यात येणार आहेत.

 

Leave a Comment